पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्यचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा तर वीर धरणातून १७ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी निरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत  वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
It is picture of never ending natural calamities Farmers injured by heavy rains are now in a new crisis
नैसर्गिक आपत्तीचा ससेमीरा कायमच! गडद धुक्यामुळे तूरपीक संकटात; शेतकरी हवालदिल
Naxal-free, India, Naxalism, Naxal,
देशातील ६० जिल्हे नक्षलमुक्त ? जाणून घ्या, देशातील नक्षलवादाची स्थिती
Dog Sterilising Centre vasai virar
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले

यंदाच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि उजनी धरण १०० टक्के भरली आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार ७५९ क्युसेक पाणी वाहत आहे.  त्यामुळे दगडी पूल  तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पूळूज हे  ६ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

भीमा  नदीपात्रात १ लाख १५ हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. नदीपात्रात जर १ लाख ३८  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. सध्या वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी. असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केली आहे. भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे. नदीकाठच्या  गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरू नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.

Story img Loader