पंढरपूर : उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून मोठय़ा प्रमाणात पाण्यचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून ६० हजार क्युसेकचा तर वीर धरणातून १७ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. तर नाझरे धरणातून कऱ्हा नदीत १५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कऱ्हा नदीचे पाणी निरा नदीत मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत  वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

is Dissatisfaction in North Gadchiroli over Sohle Iron Mine
सोहले लोहखाणीवरून उत्तर गडचिरोलीत असंतोष? खाणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याला…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली
tigers existence in sahyadri belt
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात आठ वाघांचे अस्तित्व
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?

यंदाच्या हंगामात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आणि उजनी धरण १०० टक्के भरली आहेत. मात्र पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरण लाभक्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भीमा नदी पात्रात सध्या ३० हजार ७५९ क्युसेक पाणी वाहत आहे.  त्यामुळे दगडी पूल  तसेच नदीवरील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पूळूज हे  ६ बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

भीमा  नदीपात्रात १ लाख १५ हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरते. नदीपात्रात जर १ लाख ३८  हजार  क्युसेक विसर्ग आल्यावर  गोपाळपूर येथील नवीन पुलावर पाणी येते. सध्या वाढता विसर्ग पाहता नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन सतर्कता बाळगावी. असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केली आहे. भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली जात असल्याने या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे. नदीकाठच्या  गावातील नागरिकांना सतर्कता बाळगावी. नदीपात्रात उतरू नये. स्थानिक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलअधिकारी, पोलीस पाटील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी केले आहे.