विविध धरणातून होत असलेला विसर्ग लक्षात घेउन पूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी तीन वेळा वाढ करून सायंकाळी चार वाजलेपासून  ७५  हजार  क्युसेक करण्यात आला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह पश्‍चिम घाटमाथ्यावर जोरदार पाउस पडत असल्याने पूराचा धोका कायम आहे. 

हेही वाचा >>> प्रतिष्ठित घराण्यातील मुलींची कोट्यवधींची जमीन हडपली; भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!

चांदोली, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाउस कोसळत असला तरी आज सकाळपासून पश्‍चिम भाग वगळता जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे रोजच्या रिपरिप पावसापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, धरणातून विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीपात्रातील पाणी पातळी वाढत आहे. कृष्णेची पाणी पातळी अजूनही  मर्यादेत असून स्थिर आहे. चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून आज दुपारी बारा वाजलेपासून १ हजार ५००  क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर दोन दिवसापासून पायथा विद्युतगृहातून  ९११ क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढणार असून नदी चार दिवसापासून पात्राबाहेर प्रवाहित आहे. कोकरूड बंधारा गेले आठ दिवसापासून पाण्याखाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावर वाहतूक बंद आहे.

हेही वाचा >>> “…तेव्हा मी अमेरिकेत जाऊन बसणार”, बच्चू कडूंचं मोठं विधान

दरम्यान, पंचगंगा, वारणा नदी पात्रातील पाणी वाढल्याने पूराचा धोका निर्माण झाला आहे. त्यात कृष्णा नदीच्या उपनद्यामधूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यने अलमटटी धरणात पाण्याची आवक वाढत आहे. राधानगरी व चांदोली धरणातील विसर्ग विचारात घेउन अलमट्टी धरणातून सकाळी  ३० हजार  क्युसेकचा होणारा विसर्ग दुपारी एक वाजता  ४२ हजार  ६६० तर सायंकाळी चार वाजता  ७५ हजार करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने उघडीप दिली असली तरी सकाळी आठवाजेपर्यंत संपलेल्या  २४  तासात जिल्ह्यात सरासरी  १२.३ मिलीमीटर पाउस झाला. सर्वाधिक पाउस शिराळा तालुक्यात २९.३  मिलीमीटर तर सर्वात कमी पाउस पलूस येथे  ७.१ मिलीमीटर नोंदला गेला.

Story img Loader