मुंबई : बाह्ययंत्रणेकडून कामगार भरती करण्याचा निर्णय लागू केल्यापासून ते आजतागायत एकूण १२०६ जणांची भरती करण्याचा निर्णय करण्यात आला असून त्यातील ८०४ जणांची प्रत्यक्षात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आल्याची माहिती कामगार विभागाचे आयुक्त सतीश देशमुख यांनी दिली. बाह्ययंत्रणेद्वारे शासनाच्या विविध विभागात भरती करण्याचा सुधारित निर्णय ६ सप्टेंबर २०२३ रोजी झाला.

हेही वाचा >>> “…म्हणून आम्ही कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
The application deadline for 25 percent reserved seats in private schools under rte has been extended
‘आरटीई’अंतर्गत प्रवेश अर्जांसाठी मुदतवाढ, आतापर्यंत किती अर्ज दाखल?
rrb group d level 1 exam syllabus pattern 2025 full details here
रेल्वेत तब्बल ३२ हजार पदांची भरती; हा घ्या परिक्षेचा पॅटर्न आणि लागा तयारीला; सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी
If Supriya Sule teaches some lessons to office bearers half of Maharashtra will be safe says Rupali Chakankar
सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल : रुपाली चाकणकर
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
RRB Group D Recruitment 2025 Online Notification OUT
सुवर्णसंधी! तरूणांनो लागा तयारीला, रेल्वेत सर्वात मोठी भरती; तब्बल ३२ हजार पदांची भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?

या निर्णयानुसार कोणत्या विभागात किती भरती झाली. याची शासकीय नोंद ठेवण्यासाठी कामगार विभागाने कामगार आयुक्त कार्यालयात ‘ऑनलाइन पोर्टल’ सुरू केले. यानुसार हा शासन निर्णय रद्द होईपर्यंत एकूण १२०६ जागांच्या भरतीस मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यातील ८०४ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बाह्ययंत्रणेद्वारे भरती करण्याचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. हा निर्णय झाल्यापासून याची अंमलबजावणी  मंद गतीने झाली, असे कामगार आयोगाचे म्हणणे आहे. बाह्ययंत्रणेद्वारे भरती करण्याचा सर्वप्रथम विचार २७ सप्टेंबर २०१० मध्ये काढलेल्या शासन निर्णयात झाला.

Story img Loader