सांगली : सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे केनान शुगर कंपनीत अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील ९५ नागरिकांची ऑपरेशन कावेरीअंतर्गत सुटका करण्यात आली असून, हे नागरिक बुधवारी मुंबईत पोहोचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू असून यामुळे युद्धस्थळापासून ४०० किलोमीटर अंतरावर केनान शुगर कंपनीमध्ये सांगली जिल्ह्यातील शंभर ते १२० नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासन या नागरिकांंच्या संपर्कात होते. अडकलेल्या ९५ नागरिकांची पहिली तुकडी वायूसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान सौदी अरेबियातील जेधाह मार्गे मायदेशी मुंबईत सुखरूप पोहोचली.

हेही वाचा – “नाना पटोलेंना त्यांचा पक्ष…”, ‘त्या’ टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “राहुल गांधी त्यांच्यापेक्षा…!”

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या ३७० भारतीयांपैकी ९५ लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सांगलीत बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक

यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना आणीबाणीचे पारपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत.

सुदानमध्ये यादवी युद्ध सुरू असून यामुळे युद्धस्थळापासून ४०० किलोमीटर अंतरावर केनान शुगर कंपनीमध्ये सांगली जिल्ह्यातील शंभर ते १२० नागरिक अडकले आहेत. जिल्हा प्रशासन या नागरिकांंच्या संपर्कात होते. अडकलेल्या ९५ नागरिकांची पहिली तुकडी वायूसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान सौदी अरेबियातील जेधाह मार्गे मायदेशी मुंबईत सुखरूप पोहोचली.

हेही वाचा – “नाना पटोलेंना त्यांचा पक्ष…”, ‘त्या’ टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “राहुल गांधी त्यांच्यापेक्षा…!”

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली मार्फत झालेल्या पाठपुराव्यानुसार सुदान देशातील शुगर फॅक्टरीत अडकलेल्या ३७० भारतीयांपैकी ९५ लोकांची पहिली बॅच भारताकडे आली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तानाजी पाटील, जितेंद्र डोळ, सागर जाधव, संदीप खराडे, राजू भुजबळकर, राजाराम पाटील, श्रीकांत पाटील यांचा समावेश आहे.

हेही वाचा – सांगलीत बारा लाखांचे खवले जप्त, दोघांना अटक

यातील तानाजी पाटील (रा. सुर्यगांव, ता. पलूस) यांच्याशी संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेले नागरिक सुखरूप आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय सातत्याने नागरिकांच्या संपर्कात आहे. भारतीय दुतावास सर्वोतोपरी मदत करत असून नागरिकांना आणीबाणीचे पारपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने आम्हाला भारतात आणले असून आमचा प्रवास सुखरूप झाला आहे. आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत.