सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळी कारभार पुन्हा उजेडात आला आहे. बिएस्सी  द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राच्या परीक्षेत ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ९९ गुण देण्यात आल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटल्यावर राजकारणात येणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Mumbai University, Winter Session Exams,
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा २३ ऑक्टोबरपासून
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
hidden camera in girls washroom hostel news
Andhra Pradesh : मुलींच्या वसतीगृहातील स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा? मध्यरात्री विद्यार्थिनींचं महाविद्यालय परिसरात आंदोलन, कुठं घडला प्रकार?
Recruitment professors Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १३३ जागांवर भरती, अर्ज प्रक्रिया कधीपासून?
abhimat university medical education
अभिमत विद्यापीठातून डॉक्टर होण्यासाठी कोट्यवधींचा खर्च, राज्यातील बहुतेक अभिमत विद्यापीठात वैद्यकीय पदवी शिक्षणाचे शुल्क कोटींच्या घरात
Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Rape and Murder : “९ ऑगस्ट पूर्वी आम्ही १६० जणी होतो, आता..”; आर.जी. कर महाविद्यालयातील महिला डॉक्टरांना भीतीने ग्रासलं
Decision to increase security of women resident doctors in B J Medical College
पुणे : महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पावले!
Social welfare warning to nine colleges in scholarship case
शिष्यवृत्ती प्रकरणात नऊ महाविद्यालयांना समाज कल्याणचा इशारा

जुळे सोलापुरातील वसंधरा महाविद्यालय आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवाढीचा अनुभव घेतला आहे. गेल्या आक्टोंबरमध्ये बीएस्सी द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्राची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असता गुणपत्रिका पाहून विद्यार्थी व पालकांना धक्का बसला. ५० गुणांच्या पेपरसाठी चक्क ८२ गुणांपासून ९९ गुण बहाल करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. विद्यापीठ परीक्षा विभागात अधुनमधून गोंधळाचा कारभार समोर येतो. त्यात आता गुणवाढीची भर पडली आहे. दरम्यान, परीक्षेत जादा गुण मिळाल्याचा प्रकार केवळ कारकुनी चुकांमुळे झाला आहे. त्यात योग्य दुरूस्ती केली जाईल, असे विद्यापीठ परीक्षा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.