Aaditya Thackeray PC: मुंबई महापालिकेच्या कारभारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. “मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे. “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी पाच हजार कोटींची घोषणा केली होती. त्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे.

“१०० वर्षांपूर्वी कोण योग्य किंवा अयोग्य होतं यावर…”, राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका!

sanjay raut reaction on amit shah mumbai statement
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
onion trader attacked robbed of rs 50 lakh cash in ahmednagar city
अडते व्यापाऱ्यांवर हल्ला करत ५० लाखांची लूट; दोघे जखमी,नेप्ती कांदा मार्केटजवळील घटना
Missing petrol pump owner, petrol pump owner murder,
वसई : बेपत्ता पेट्रोलपंप मालकाची हत्या, चालक फरार
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
Success Story Of Shash Soni
तीन ते चार क्षेत्रांत केलं काम; दहा हजारात सुरू केला व्यवसाय; असा आहे पद्म पुरस्कारानं सन्मानित शशी सोनी यांचा प्रेरणादायी प्रवास
mumbai police marathi news
नेता अडकला, पण कार्यकर्ते खंबीर…मुंबईच्या रस्त्यावर आत्महत्येचे प्रात्यक्षिक…
Theft of Rs 9 lakhs from the flat of a retired judge
सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या सदनिकेतून नऊ लाखांचा ऐवज चोरी, कामगार अटकेत

मुंबईत पाच हजार कोटींचे रस्ते बनवणार तरी कसे? असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईतील इतर रस्त्यांची कामं रखडली आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. “पाच हजार कोटींची घोषणा केल्यानंतर मुंबईतील रस्ते रातोरात खड्डेमुक्त होतील, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. येत्या पावसाळ्यात जर खड्ड्यांमुळे मुंबईकरांचे हाल झाले, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतील”, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला आहे.

“अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?”, शरद पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले…

मुंबईकरांच्या खिशातून शहराच्या सौंदर्यीकरणासाठी १७०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. हे सौंदर्यीकरण नेमकं कसं करण्यात येणार आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सौदर्यींकरण म्हणजे केवळ एलईडी लाईट लावणं नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. “मुंबई महापालिकेत दडपशाही सुरू आहे. काही लोकांच्या ९० दिवसात सहा वेळा बदल्या झाल्या आहेत. हे सरकार बदली सरकार आहे”, असा घणाघातही त्यांनी केला आहे. “मुंबई सोन्याचं अंडी देणारी कोंबडी त्यांच्यासाठी असेल, पण ही मुंबई आमची जन्मभूमी आहे”, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.