ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता शिंदे-फडणवीस सरकार पडेल पण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची ताकद आणि धमक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाही, अशी शब्दात आदित्या ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आता सरकार पडेल पण मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. यांना (एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस) सतत दिल्लीला जावं लागतं. पण विस्तार काही होणार नाही, हे लिहून घ्या. ४० लोकांमधून जे मंत्रिमंडळाबाबत आशा लावून बसले आहेत, त्यांना काहीही मिळणार नाही. मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही, कारण विस्तार करण्याची ताकद आणि धमक यांच्यात नाही.”

Navi Mumbai Semiconductor Project, Eknath Shinde,
राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
Gondia Youth Congress protest against mahayuti government
“भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Anil Vadpalliwar said eknath shinde and devendra Fadnavis misunderstood that petition is not against Ladki Bahin scheme
शिंदे, फडणवीसांचा गैरसमज, ती याचिका ‘लाडकी बहीण’ योजनेविरूद्ध नाही, वडपल्लीवार म्हणाले…

हेही वाचा- “…म्हणून फडणवीसांनी मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला”, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

“१ जुलैला मुंबईत महामोर्चा”

“१ जुलैला मुंबईत महामोर्चा काढणार आहोत. गेल्या एक वर्षापासून मुंबईत प्रशासक आहेत. येथे कोणत्याही पक्षाचा किंवा जनतेचा प्रतिनिधी नाहीये. ना नगरसेवक, ना महापौर ना कुठले समिती अध्यक्ष आहेत. हे कुणी नसताना तिथे मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरू आहेत. यामुळे १ जुलै रोजी दुपारी चार वाजता हा मोर्चा काढला जाणार आहे. सर्व मुंबईकर या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मुंबईचे हाल होतायत, असं ज्यांना वाटतंय, ते सगळे नागरिकही या मोर्च्यात सहभागी होणार आहेत,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.