केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करताना केलेल्या एका विधानावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले. याचदरम्यान २४ ऑगस्ट रोजी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसैनिक चांगलेच आक्रमक दिसून आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वरूण सरदेसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची ‘वर्षा’ येथे भेट घेतली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करणाऱ्या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांची पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली होती. पण वरुण सरदेसाई आक्रमक झालेली ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही वरूण सरदेसाई चर्चेत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांच्या मागे काही राजकीय अर्थ आहे का अशा चर्चा सध्या रंगल्या जात आहेत. काय आहे या मागचं कारण… जाणून घेऊया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा