Abdul Sattar : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराचा धडाका सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यातच काही नेत्यांचे वक्तव्य राज्याचा राजकारणात चर्चेचे ठरत आहेत. शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत असतात.

आता ऐन निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या एका विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. “मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी एका सभेत बोलताना केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमकी अर्थ काय? त्यांच्या या विधानाचा रोख नेमकी कुणाकडे? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहेत.

syria interim president ahmed al sharaa first visit to saudi
सीरियाच्या हंगामी अध्यक्षांची पहिली भेट सौदी अरेबियाला… इराणपासून फारकत घेत असल्याचे संकेत?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”

हेही वाचा : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!

अब्दुल सत्तार काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या ठिकठिकाणी प्रचाराच्या सभा पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार एका सभेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “जो नेता तुमच्या भल्यासाठी काम करतो. जो नेता तुम्ही मतदान केल्यानंतर त्या मतांचा उपयोग चांगल्यासाठी करतो. आता जर मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवू शकतो, तर हे किरकोळ लोक काय आहेत?”, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. मात्र, हे विधान करताना अब्दुल सत्तार यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा रोख हा भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे होता, अशी चर्चा आहे.

पुढे बोलताना अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना इशाराही दिला. या निवडणुकीत विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही लोक माझ्यावर टीका करतात. मात्र, आपण गेल्या अनेक वर्षात लोकांनी कोट्यावधी रुपयांची विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे विकासाची कामे जो करेल त्याला मतदान करण्याचं आवाहनही यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलं.

दरम्यान, महायुतीत असूनही शिवसेनेचे (शिंदे) मंत्री अब्दुल सत्तार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्याबाबत बोलताना स्वत:ची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच अब्दुल सत्तार यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांना डिवचलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Story img Loader