रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी समितीला सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर महामार्गावरील दुरुस्त्या केल्या जातील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. नाशिक शहरात खासगी प्रवासी बसगाडी आणि डंपरच्या झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, राज्यातील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही असलेल्या ब्लॅक स्पॉटबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आहेत. त्यांनी शोधलेले ब्लॅक स्पॉट काढून टाकण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतही विचार करावा लागेल. त्या ब्लॅक स्पॉटची तीव्रता तपासून त्यातील दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. यासाठी समितीचा अहवाल येणे अपेक्षित असून तो आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गासह संपूर्ण महाराष्ट्रात उपाययोजना करण्यात येतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा