Mumbai-Pune Highway Accident: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याशिवाय या बसमध्ये एकूण ४० ते ४५ जण प्रवास करत असल्याचीही माहिती मिळाली असून त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. प्रवाशांपैकी २० ते २५ जण जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईच्या गोरेगावमधील बाजीप्रभू वादक गट (झांज पथक) हे पुण्याला एक कार्यक्रम करण्यासाठी गेले होते. पुण्याहून परत येत असताना त्यांच्या बसला जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाला. शिंगरोबा मंदिराच्या अलिकडील घाटात ही बस बाजूच्या दरीत कोसळली. पहाट ४ च्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगडच्या खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Murlidhar Mohol, air travel students,
मोहोळ यांच्या कार्यालयात दूरध्वनी करताच १२० विद्यार्थ्यांच्या हवाई प्रवासातील विघ्न दूर! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
panvel traffic police
कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस सरसावले, पहिल्याच दिवशी रस्ता अडविणाऱ्या चालकांवर सहा फौजदारी गुन्हे दाखल
Builders have an upbeat picture of rising home sales in the near future
पुण्या-मुंबईत घरांच्या खरेदीसाठी अच्छे दिन? बांधकाम क्षेत्र काय म्हणतंय जाणून घ्या…
Diwali bonuses credited to Tata Motors employees accounts less than 24 hours after Ratan Tatas death
पिंपरी : टाटा मोटर्सच्या कामगारांना ४९ हजारांचा बोनस
Hospital for animals set up by Mumbai Municipal Corporation in collaboration with Tata Trust Mumbai news
प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण, पण उद्घाटन राहिले…; मुंबई महापालिकेने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारले रुग्णालय
child died in a collision with a municipal garbage truck in Govandi Mumbai news
गोवंडीमध्ये महापालिकेच्या कचरावाहू ट्रकच्या धडकेत चिमुरड्याचा मृत्यू
chembur chawle fire
चेंबूरच्या आगीत माणुसकीही झाली खाक, चोरट्यांनी उद्ध्वस्त घरात डल्ला मारत १२ लाखांचा ऐवज चोरला

“घाट परिसर असल्यामुळे उतार खूप जास्त आहे. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालेला असण्याची शक्यता आहे. बसमध्ये एकूण ४१ प्रवासी होते. त्यातल्या २७ जणांना वाचवण्यात आलं आहे. इतरांना वर काढण्याचं काण चालू आहे. बचावकार्यात खोपोलीतील पथक, खंडाळ्यातील पथक, स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस यांनी महत्त्वाची मदत उपलब्ध करून दिली. आमच्या माहितीनुसार १३ जण दगावले आहेत”, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी वेगाने मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप व आयआरबीचं पथकही हजर आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

“आम्ही खाली जाऊन बघितलं तर काहीजण मृत झाले होते. जखमींना आम्ही वर घेतलं. किमान १३ ते १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे”, अशी माहिती बचावकार्य करणाऱ्या सदस्याने पीटीआयशी बोलताना दिली.

मृतांची हाती आलेली नावे…

१) जुई दिपक सावंत, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुबई
२) यश सुभाष यादव
३) वीर कमलेश मांडवकर, वय ६ वर्ष
४) वैभवी साबळे, वय १५ वर्ष
५) स्वप्नील श्रीधर धुमाळ वय १६ वर्ष
६) सतिश श्रीधर धुमाळ, वय २५ वर्ष
७) मनीष राठोड, वय २५ वर्ष
८) कृतिक लोहित, वय १६ वर्ष, गोरेगाव, मुंबई<br>९) राहुल गोठण, वय १७ वर्ष, गोरेगाव मुंबई
१०) हर्षदा परदेशी, वय १९ वर्ष, माहीम,मुंबई
११) अभय विजय साबळे, वय २० वर्ष, मालाड, मुंबई
१२) एक मयत ओळख पटलेली नाही.