Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. राज्य सरकारच्या विरोधी बाकावर बसलेला नेता आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याने महाराष्ट्रातील जनताही गोंधळली आहे. यावरून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या असून विरोधकांकडून टीकाही केली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी मी या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहे, असं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करून राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.

“मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत विचारला आहे.

satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
BJP Leader Said This Thing About Ajit Pawar
Mahayuti : महायुतीत ठिणगी? “अजित पवारांबरोबरची युती म्हणजे असंगाशी संग, त्यांनाही..”, भाजपा नेत्याचं वक्तव्य
congress welcomes president Draupadi murmu
राष्ट्रपतींनी संपूर्ण देशाचा आक्रोश व्यक्त करावा! महिला अत्याचारसंबंधी द्रौपदी मुर्मू यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसची अपेक्षा
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande : “संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी झालाय, त्यामुळे त्यांना…”; राज ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेला मनसेचं प्रत्युत्तर!
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Ragini Nayak, Congress Spokesperson Ragini Nayak, ragini nayak critices mohan bhagwat, Mohan Bhagwat, Narendra Modi, anti women, Badlapur incident
‘संघप्रमुखांना केवळ विजयादशमीला ‘नारी-शक्ती’ आठवते, मोदींचे मौनही संतापजनक…’ काँग्रेसच्या प्रवक्त्याने……
Raj Thackeray Speech in Yavatmal
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणात पॅराग्लायडरच्या गिरक्या; वर पाहात म्हणाले, “हा माणूस…”

हेही वाचा >> “जरा थांबा हो, शरद पवारांनी अजून फोनाफोनी सुरू केलेली नाही”, जितेंद्र आव्हाडांचं सूचक विधान; नेमकं काय घडणार?

“रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी?”, असाही मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.

“एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला?? आणि सर्वात महत्वाचं… आम्ही काँग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना… एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!”, असंही टीकास्त्र आदित्य ठाकरेंनी सोडलं.

राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड

दरम्यान, राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा अजित पवारांनी शुक्रवारीच राजीनामा दिला होता. त्यामुळे अजित पवारानी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राष्ट्रावादीने राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. तसंच, अनिल पाटील यांच्याकडे असलेले प्रतोदपदही जितेंद्र आव्हाडांना देण्यात आले आहे. त्यामुळे मी जो व्हिप जारी करेन तोच सर्वांना लागू होईल, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.