मागील काही महिन्यांमध्ये फॉक्सकॉन वेदान्त, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. राज्यात होणारी मोठी आर्थिक गुंतवणूक गुजरात राज्यासह इतर राज्यांत गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे परराज्यात गेलेले सर्व प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या सत्ताकाळात काहीही काम केलेले नाही, असा दावा सत्ताधारी शिंदे गट-भाजपाकडून केला जात आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून समोरासमोर चर्चेसाठी यावे, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी ट्विटरवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी ते ‘ट्विटर पोल’ पोल घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा