उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ आमदारांसह राष्ट्रवादीत बंड केल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार, कोणाची कायदेशीर मजबूत आहे? अशी चर्चा रंगू लागली आहे. यावर वकील असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

असीम सरोदे म्हणाले, “सध्या शरद पवारांच्या बाजूने संविधान आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या राजकीय पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवारांनी नियुक्त केलेला प्रतोद आणि प्रदेशाध्यक्षांना महत्व आहे.”

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Chhagan Bhujbal allegations against Sharad Pawar regarding Telgi case pune news
तेलगी प्रकरणात राजीनामा घेण्याची शरद पवारांंना घाई; छगन भुजबळ यांचा आरोप
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Ashish Shelar on Raj Thackeray
Ashish Shelar: “मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो की…”, राज ठाकरेंनी निकालावर संशय घेताच भाजपाचा पलटवार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

हेही वाचा : शरद पवारांची अजित पवारांसह ९ आमदारांच्या शपथविधीला मूकसंमती? रोहित पवार म्हणाले, “त्यांच्या मनात काय, हे…”

“एकनाथ शिंदेंनी राजकारणातील नवीन बेकायदेशीर बाराखडी निर्माण केली आहे. त्याच पावलांवर पाऊल टाकत अजित पवार सत्तेच्या एक पदावर स्थानपन्न झाले आहेत. हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे,” असेही असीम सरोदे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान

“अजित पवार आणि शरद पवारांचं भांडण हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. पण, कायद्याच्या दृष्टीने पाहात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं एकीकडं पालन होत नाही. एकनाथ शिंदे यांच्यानंतर हा पायंडा पडला आहे. ही घटनाबाह्यता प्रस्थापित होत आहे. तो लोकशाहीला धोका आहे,” अशी चिंता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader