केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना संपलेली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच शिंदे गटाचा उल्लेख चोर असा केला. या सगळ्या दरम्यान काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांनी एक भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली आहे अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी २० वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांना शिवसेना आणि भाजपा बाबत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रमोद महाजन यांनी एक भाकीत केलं होतं. तेच भाकित आज खरं ठरलं आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.

Dhananjay Munde on Namdev Shastri Maharaj
Dhananjay Munde : महंत नामदेव शास्त्री महाराजांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर धनंजय मुंंडेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “इतकी मोठी शक्ती…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Donald Trump Speech
Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख, “देवाने मला वाचवलं कारण..”

काय म्हटलं आहे राजदीप सरदेसाई यांनी?

देशात अटलबिहारी वाजपेयीचं सरकार होतं. त्या काळात मुंबईचे शेरीफ नाना चुडासमा होते. त्यांच्या घरी एक पार्टी होती. प्रमोद हे मंत्रिमंडळातलं मोठं नाव होतं. मी त्या पार्टीत असताना प्रमोद महाजन यांना विचारलं की दिल्लीत तुम्ही क्रमांक एकचा पक्ष आहात आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवत आहात पण महाराष्ट्रात तुम्ही लहान भाऊ आहात. तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यावर प्रमोद महाजन मला म्हणाले की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल. गेल्या आठ वर्षात भाजपाने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे प्रमोद महाजन यांनी केलेलं भाकित खरं ठरलं आहे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत राजदीप सरदेसाई यांनी ही आठवण सांगितली आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपा आणि शिवसेनेची महाराष्ट्रात युती झाली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांना या युतीचे शिल्पकार मानलं जात होतं. मात्र २०१४ ला पहिल्यांदा युती तुटली. त्यानंतर २०१९ ला काय झालं ते आपल्याला माहित आहेच. आता प्रमोद महाजन यांच्या त्या वक्तव्याची चर्चा होते आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं सर्वात बंड केलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आपल्यामागे महाशक्ती आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आता महाराष्ट्रात भाजपा मोठा भाऊ आहे हे दिसून येतं आहेच.

Story img Loader