सांगली : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल असा संदेश महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी समाज माध्यमातून दिला आहे. लोकसभा निवडणुकीत ६० हजार ८६० मते मिळाल्यानंतर अनामत रक्कमही जप्त झाली. तीन मोठ्या पक्षांची महाविकास आघाडी असताना बूथ लावण्यास कार्यकर्तेही काही ठिकाणी मिळाले नाहीत. यामुळे गेले दोन दिवस कुणाशीही त्यांनी संपर्क साधला नाही. मात्र, समाज माध्यमावर संदेश पाठवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

या संदेशात पहिलवान पाटील म्हणतात, या निवडणुकीत कुणाला दिलदार शत्रू, तर कुणाला दिलदार मित्र मिळाले, पण माझ्यासारख्या शेतकर्‍याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले. पण प्रत्येकाची वेळ येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल. या संदेशात रोख कुणावर यावर सध्या चर्चा सुरू आहे.

Chief Minister Eknath Shinde testimony regarding Irshalwadi displaced houses
इरशाळवाडी विस्थापितांना हक्काची घरे मिळणार; निवडणूक आचारसहिंता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
Asmita Patil suicide case investigation is necessary Jayant Patil request to Police Commissioner
अस्मिता पाटील आत्महत्या प्रकरणाची चौकशी गरजेची, जयंत पाटील यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
Sharad Pawar On Ajit Pawar
Sharad Pawar : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “आम्ही…”
MLA Rajendra Raut thiyya movement is suspended
आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन स्थगित
Rajendra Raut protest started in Barshi on reservation issue solhapur
सोलापूर: आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन सुरू
Bhagyashri Atram On Ajit pawar
Bhagyashree Atram: “अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…”, भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार; भाषणातून चौफेर टीका

हेही वाचा – “शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो”, जयंत पाटील यांचं वक्तव्य

हेही वाचा – अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत का? सुनील तटकरे म्हणाले, “आमचे सर्व आमदार…”

दरम्यान, निवडणुकीतील पराभवाबाबत उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जे झाले ते सर्वांनीच पाहिले आहे. आम्ही आमच्या उमेदवाराबाबत मतदारांच्यात विश्‍वास निर्माण करण्यात कमी पडलो. या निवडणुकीत ज्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी गद्दारी केली, त्यांची पदे काढून घेण्यात येतील, नव्यांना संधी देऊन पुन्हा पक्ष बांधणी जोमाने करू. येत्या विधानसभा निवडणुकीत आमची ताकद उभी करत असताना उमेदवाराबद्दल विश्‍वास निर्माण करू. आमच्या काही उणिवा होत्या हे लक्षात आले असून त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल.