शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. सहा महिन्यानंतर स्वाभिमानानं तुमचा भास्कर जाधव या भागांत मंत्री म्हणून फिरेल, असा निर्धार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत सत्तेवर बसलेल्यांकडून राजकारणाचा स्तर खाली घसरवण्याचं काम देशपातळीवर सुरू आहे, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “ही लढाई आपली, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहा महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधव या भागात, जिल्ह्यात आणि राज्यात स्वाभिमानानं आणि सन्मानानं मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ दिली. तशीच साथ द्यावी.”

Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
Raigad Guardian minister post , Aditi Tatkare ,
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना – राष्ट्रवादीत खडाखडी 
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा : “माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर…”, सुप्रिया सुळेंचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

“मी जिथे उभा राहील त्याठिकाणी सगळेजण माझ्याविरोधात तुटून पडणार आहेत. मात्र, यांच्याविरोधात कुणीतरी लढलं पाहिजे. कोकणातल्या लाल मातीचा स्वाभिमान वेगळा आहे, हे लक्षात ठेवा,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.

हेही वाचा : “यांना वाघनखे टोचतात अन् पेंग्विन घेऊन, हे…”, भाजपाची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका

“शिवसेना फोडल्यानंतर भाजपानं सहा ते सात सर्वे केले. सगळ्या सर्वेत मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचे सर्व नगरसेवक निवडून येतील. भाजपाचे फक्त २८ येतील. भाजपाचे शिवसेना धरून ४१ खासदार आहेत. पण, उद्या निवडणूक झाली, तर भाजपाचे सहा ते सात खासदार येतील, असा अहवाल आहे,” असा भास्कर जाधव यांनी सांगितलं.

Story img Loader