लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र बेताबेताने पिकांना पोषक ठरणारा पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांत पावसाने उघडीप दिल्यानंतर तीव्र उकाडा जाणवत असताना, खरीप पिकांच्या वाढीसाठी पुन्हा पावसाची सार्वत्रिक अपेक्षा होती. सुदैवाने मघा नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर कमी-जास्त प्रमाणात पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

Patil family grew strawberries farm in Nagpur
पाटील कुटुंबाने पिकविली रसदार स्ट्रॉबेरी, नागपूरकरांच्या पडतात उड्यावर उड्या
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
MLA Rohit Pawar experienced sorghum harvesting farm karjat jamkhed
आमदार रोहित पवार यांनी शेतामध्ये घेतला ज्वारी काढणीचा अनुभव
parbhani cotton production loksatta news
करोना काळात परभणीत वाढलेला कापूस यंदा घटला
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
soybean procurement target for 2024 25 has adjusted based on district responses
राज्यात सोयाबीन खरेदीमध्ये सहा जिल्ह्यांच्या उद्दिष्टांना कात्री
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी

ढगांच्या गडगडाटासह मघा नक्षत्राच्या सरी कोसळत असल्यामुळे उकाड्याची तीव्रता कमी जाणवत आहे. काल शुक्रवारी रात्री पावसाच्या हलक्या व मध्यम सरी कोसळल्यानंतर शनिवारी, दुसऱ्या दिवशी पुन्हा पावसाने हजेरी लावली. दक्षिण सोलापूर (१३.५), मोहोळ (१८), माढा (१५.३), करमाळा (१६.५), पंढरपूर (१६.४), माळशिरस (८.८), अक्कलकोट (८.४) आदी तालुक्यांमध्ये पिकांसाठी पोषक ठरणारा पाऊस झाला. उत्तर सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला या भागात तुलनेने अत्यल्प पाऊस झाला.

आणखी वाचा-पंढरपूर दर्शन मंडपासह ‘स्काय वॉक’साठी ११० कोटींच्या आराखड्याला मान्यता

जिल्ह्यात यंदा समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामात पिकांचा पेरा वाढला आहे. विशेषतः सोयाबीन आणि उडीद लागवड प्रत्येकी दीड लाख हेक्टरच्या घरात असून, ही पिके चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. मका, तूर, बाजरी आदी इतर पिकांची स्थितीही चांगली असल्याचे दिसून येते.

गेल्या जूनमध्ये एकूण सरासरी १६ दिवसांत २२८.२ (२२२.६ टक्के) पाऊस झाला होता, तर मागील जुलैमध्ये सरासरी १३ दिवसांत १२३.८ (१३०.६ टक्के) एवढा पाऊस झाला होता. चालू ऑगस्टमध्ये सरासरी ५ दिवस ४७.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

Story img Loader