नगरः श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी मुरकुटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूरमधील राहत्या घरातून अटक केली. तक्रार देणारी महिला राहुरी तालुक्यातील आहे. या महिलेने काल, सोमवारी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Dhananjay Munde
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या शपथपत्रात पाच अपत्यांचा उल्लेख, २०१९ मध्ये तिघांचीच नोंद; पाच वर्षांत संपत्तीही दुप्पट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shaina NC Arvind Sawant
Shaina NC : अरविंद सावंत यांची जीभ घसरली; अपशब्द वापरल्याने शायना एन. सी. संतापल्या, म्हणाल्या, “महिलेला…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
shrinivas pawar and ajit pawar
Shrinivas Pawar : अजित पवारांचा शरद पवारांवर घर फोडल्याचा आरोप? थोरले भाऊ म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Sports Journalist Dwarkanath Sanzgiri Passes Away
Dwarkanath Sanzgiri Death : द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन, क्रिकेट विश्वावर हरहुन्नरी लेखन करणारी लेखणी शांत
फॉण्टची मुक्त दुनिया
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हेही वाचा – रायगडात लाखभर लाडक्या बहिणींची आधार जोडणी अभावी कोंडी

हेही वाचा – Gulabrao Patil : “आम्ही नवरदेवाकडून होतो आणि भाजपावाले आता..”, गुलाबराव पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात. श्रीरामपूरच्या पाणीप्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती.

Story img Loader