विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (दि. २० डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले प्रस्ताव जोरकसपणे मांडले. त्यावर सरकारच्या मंत्र्यांनीही विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका ठेवल्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. शेवटच्या दिवशी विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यावरील चर्चा होत असताना सत्ताधाऱ्यांकडून विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विरोधकांकडून विदर्भाचा प्रस्ताव यायला हवा होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले. मात्र त्यानंतर फडणवीस यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर द्यायला उभे राहिले आणि त्यांनी जयंत पाटील यांना “आता हे धंदे बंद करा…”, असे जोरदार प्रत्युत्तर दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा