मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी आज (२५ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस हे माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, जरांगेंच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. त्यांनी जरांगे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. ते आज (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आपण काय बोलतोय हे…”

“मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागले आहे. प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. परंतु आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय हे थोडे पाहिले पाहिजे. काहीजण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहेत. हे नक्की कोण करतंय. एवढं धाडस कसं होत आहे. याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे,” असे अजित पवार म्हणाले.

abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
question of alternative to POP idol remains unsolved
पीओपी मूर्तींच्या पर्यायाचा प्रश्न अनुत्तरितच
eknath shinde, Pratap Sarnaik,
साहेब असा अंगठा दाखवून चालणार नाही, निधी द्यायलाच लागेल; आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांसमोरच निधीची मागणी
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : न्यायदानातील विलंबही कारणीभूत
karnataka high court relief siddaramaiah in land scam row
सिद्धरामय्या यांना न्यायालयाचा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश
Chhagan Bhujbal , Nar-Par ,
Chhagan Bhujbal : नार-पारविषयी माझी भूमिका हा योग्य पर्याय – छगन भुजबळ यांचा दावा

“मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गेले”

“याआधीही अनेकांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे प्रमुख एकदा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी, सर्वांमध्ये एकोपा राहावा, प्रश्न धसास जावा यासाठीचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री दोनदा आंदोलकांची भेट घ्यायला गेले,” असे अजित पवार म्हणाले.

“काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये”

“याआधी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी फार बारकाईने काम केले जात आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असताना आजदेखील वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तव्यं केली जात आहे. मुख्यमंत्र्यांबाबत शिवराळ भाषा केली जाते. अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोललं तरी खपतं असं कोणी समजू नये. असं होणार नाही. शेवटी सर्वांना नियम आणि कायदे सारखे आहेत,” असा इशाराही अजित पवार यांनी मनोज जरांगेना दिला.

“गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये”

“कारण नसताना समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आपल्याकडे आरक्षण हे ७२ टक्के झालं आहे. त्यामुळे यावर बारकाईने काम होणं गरजेचं आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेवर साडे सहा लाख हरकती आलेल्या आहेत. त्यावर काम चालू आहे. शेवटी काम करताना मागणी कायद्याच्या चौकटीत कशी बसेल हे पाहणे महत्त्वाचे असते. याची नोंद सर्वांनी घ्यावी. सरकार चांगले काम करत आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न कोणी करू नये,” असे आवाहन अजित पवार यांनी केले.