२००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा असूनही त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिला होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी पक्षाचे तेव्हाचे प्रमुख शरद पवारांवर अलीकडच्या काळात नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “२००४ च्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री बनवलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असता.” शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे धादांत खोटं आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा