Baba Adhav protesting for Constitution in Pune Ajit Pawar Visits : ज्येष्ठ समाजसेवक व लेखक बाबा आढाव हे सध्या पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. देशात लोकशाहीचे अक्षरशः वस्त्रहरण सुरू झाले आहे. त्याविरोधात राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचं आढाव यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार ते तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आज (३० नोव्हेंबर) त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. तसेच बाबा आढाव यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. आम्हाला त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करता येत नाही”.

अजित पवार म्हणाले, “मला बाबा आढाव यांना सांगायचं आहे की काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी संबंधित असतात. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. काही गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही. त्यांना जे योग्य वाटतं, ते निर्णय त्यांनी दिले आहेत. मी स्वतः बारामतीचा उमेदवार होतो. मी पाहिलं आहे की संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर मतदारांची गर्दी वाढली होती. मी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की सहा वाजेपर्यंत जेवढे मतदार येतील त्या सर्वांसाठी बाहेर वीजेची व्यवस्था करा आणि सगळ्यांना मतदान करता येईल याची काळजी घ्या”.

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Ashok Saraf
“नशीब काढलंय मी…”, अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सहकलाकाराची खास पोस्ट; म्हणाली…
Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”

हे ही वाचा >> “शिवसेनेची गृहमंत्रीपदाची मागणी, भाजपाचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, मीडियासमोर वक्तव्य करून…”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

माजी उपमुख्यमंत्री म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून आल्या होत्या. आमच्या केवळ १७ जागा आल्या. आम्ही तो पराभव मान्य केला. कारण तो जनतेचा कौल होता. परंतु, तेव्हा कोणीच ईव्हीएम वरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघात माझा उमेदवार ४८ हजार मतांनी पराभूत झाला. मात्र मी त्याच मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आलो आहे. कारण बारामतीच्या जनतेचं पहिल्यापासून ठरलेलं आहे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. त्यानुसारच ते मतदान करतात. लोकसभा निवडणुकीत ज्या गावांमधून आम्हाला मतदान मिळालं नाही, तिथं मला विधानसभेच्या वेळी भरभरून मतदान मिळालं आहे. आता पाच महिन्यांत जनतेचा कौल बदलला याला आम्ही काय करणार.”.

हे ही वाचा >> “एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावी गेलेत”, संजय राऊतांचा बोचरा वार; नेमकं काय म्हणाले?

१९९९ च्या निवडणुकीवेळी बारामतीमधील मतदारांनी शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत ८५ हजार मतांनी जिंकवलं होतं. मला त्यावेळी केवळ ५० हजार मतांची आघाडी मिळाली होती. परंतु, तेव्हा मी त्यावेळी निवडणूक प्रणालीवर संशय व्यक्त केला नव्हता, असं अजित पवार म्हणाले.

Story img Loader