हा काही राजकीय भूकंप आहे वगैरे मला वाटत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांनी शपथ घेतली ते आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की शिंदेंच्या फुटीर गटासंदर्भात जो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ते आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची सुरुवात आहे. त्यामुळे नवी टीम भाजपाने घेतली आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचा तिसरा अंक पाहण्यास मिळाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकार अस्थिर झाल्यानेच हे सगळं घडवून आणण्यात आलं आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

माझं शरद पवारांशी या विषयावर बोलणं झालं आहे. ते खंबीर आहेत, उद्धव ठाकरेंशीही चर्चा झाली आहे. शरद पवार, काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरे आम्ही खंबीरपणे उभे राहू. लोकांचा या सगळ्याला पाठिंबा नाही. आम्ही सगळे एकत्र राहू याबद्दल माझ्या मनात शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा शिंदे गटाचा होणार होता. अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बसून बसले होते. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा जो शपथविधीच्या वेळी सगळ्यांचे चेहरे पाहिले का? कोणताही कायदा आणि कोणतीही पळवाट शिंदे आणि त्यांच्यासहच्या गटाला अपात्र ठरवण्यापासून बोलत नाहीत. मी सांगतो आहे राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल हे माझं भाकीत नाही माझं परखड मत आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना सगळं प्रकरण माहित होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्यांना तुरुंगाचे दरवाजे उघडले होते त्यांना मंत्रिपद दिलं आहे आता भाजपा काय बोलणार? भाजपाचे पोपटलाल कुठे आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

Story img Loader