हा काही राजकीय भूकंप आहे वगैरे मला वाटत नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांनी शपथ घेतली ते आम्ही पाहिलं. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे फडणवीस सरकार अस्थिर आहे. याचा अर्थ असा आहे की शिंदेंच्या फुटीर गटासंदर्भात जो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ते आमदार अपात्र ठरणार आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची सुरुवात आहे. त्यामुळे नवी टीम भाजपाने घेतली आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपाचा तिसरा अंक पाहण्यास मिळाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सरकार अस्थिर झाल्यानेच हे सगळं घडवून आणण्यात आलं आहे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

leaders pay tributes for Sitaram Yechury
Sitaram Yechurys Death : ‘डाव्या पक्षांचा आवाज हरपला’
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
Jitendra Awhads sharp criticism on the Chief Minister Eknath shinde
वाऱ्याने उडून जाण्याच्या भीतीने पर्यटकांची कोकणाकडे पाठ, जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

माझं शरद पवारांशी या विषयावर बोलणं झालं आहे. ते खंबीर आहेत, उद्धव ठाकरेंशीही चर्चा झाली आहे. शरद पवार, काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरे आम्ही खंबीरपणे उभे राहू. लोकांचा या सगळ्याला पाठिंबा नाही. आम्ही सगळे एकत्र राहू याबद्दल माझ्या मनात शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार हा शिंदे गटाचा होणार होता. अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बसून बसले होते. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा जो शपथविधीच्या वेळी सगळ्यांचे चेहरे पाहिले का? कोणताही कायदा आणि कोणतीही पळवाट शिंदे आणि त्यांच्यासहच्या गटाला अपात्र ठरवण्यापासून बोलत नाहीत. मी सांगतो आहे राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळेल हे माझं भाकीत नाही माझं परखड मत आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना सगळं प्रकरण माहित होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ज्यांना तुरुंगाचे दरवाजे उघडले होते त्यांना मंत्रिपद दिलं आहे आता भाजपा काय बोलणार? भाजपाचे पोपटलाल कुठे आहेत असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.