उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांचं शनिवारी ( २६ ऑगस्ट ) बारामतीत आगमन झालं. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव आणि हारतुरेच्या माध्यमातून अजित पवारांचं स्वागत करण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी बारामतीतील जनतेला संबोधित केलं. तेव्हा अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलं आहे.

“२००४ साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं. पण, आता मी काय करणार? मला काही गोष्टी बोलता येत नाहीत. तेव्हा सोनिया गांधी यांनी विलासराव देशमुख यांना सांगितलं, ‘राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यांचे आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरवतील.’ मात्र, मुख्यमंत्री होऊ शकला नाही.”

transport minister pratap sarnaiks statement aims to pressure officials asserting his final decision
‘एसटी’त सर्व अधिकार संचालक मंडळालाच, परिवहन मंत्र्यांकडून दबावाचा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
Delhi Election Result
Delhi Election Result : दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले…
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Pm Narendra Modi Speech in Rajayasabha
Pm Narendra Modi : “काँग्रेससाठी गाणं न म्हटल्याने किशोर कुमार यांना आकाशवाणीचे दरवाजे बंद” झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
What Narendra Modi Said?
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, “नेहरू-इंदिरा गांधींपासून काँग्रेसच्या सरकारांमध्ये १२ लाखांवर ३ लाखांचा कर…”

“उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यावेळीही, शिवसेनेचे ६५ तर राष्ट्रवादीचे ५४ आमदार होते. मात्र, अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नाही. सध्या मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. त्याला न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करू,” असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : “मित्रांनो ठीक आहे, मागे मीच मोदींविरोधात सभा घेतल्या, कारण…”; बारामतीतील भाषणात अजित पवारांचं वक्तव्य

“कारखानदारी अडचणीत आहे. यंदा ऊस कमी आहे. गाळप किती दिवस होईल, याची माहिती नाही. माळेगावातील लोकांना ३३५० पेक्षा ऊसाला भाव मिळेल. पण, छत्रपती कारखान्याचं काही विचारू नका. सोमेश्वर कारखान्यात गडबड झाली. तशीच छत्रपती कारखान्यात झाली आहे. छत्रपती कारखान्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच त्यात यश मिळेल,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींचं विधान चर्चेत

“अन्यही संस्था चांगल्या पद्धतीने चालवू. बारामती आणि जिल्ह्याचं भलं करण्याचं करू. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना खेचून आणण्याचा प्रयत्न करू. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस मी आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास करण्याची ग्वाही देतो,” असेही अजित पवारांनी म्हटलं.

Story img Loader