रत्नागिरीतल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. तर आतापर्यंत पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या प्रकल्पावर आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील याविषयी त्यांची भूमिका आज माध्यमांसमोर मांडली.

अजित पवार म्हणाले की, बारसू रिफायनरीप्रश्नी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच काल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पवार साहेबांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आमचा पक्ष विकासाआड नाही. परंतु विकास करताना पर्याावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जावी, आधी लोकांच्या मनातले प्रश्न निकाली काढावे.

bachchu kadu on ajit pawar faction mla
Bachchu Kadu : “अजित पवार गटाचे अर्ध्याहून अधिक आमदार…”; प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
After Ganeshotsav Dharavi resident will on streets against Adani
मुंबई : गणेशोत्सवानंतर धारावीकर अदानीविरोधात रस्त्यावर उतरणार
SRA project to be done along Mumbai-Bangalore highway
पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?
95 percent increase in cost of Versova Bay Madh connecting project ravi raja Mumbai news
वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
liquor sale ban in pune marathi news
पुणे: उत्सवात मध्यभागात मद्य विक्री बंद? पोलीस आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव; उत्सवात चोख बंदोबस्त
navi Mumbai, pressure from politicians
पुनर्विकास प्रकल्पात राजकीय झुंडशाही? ठरावीक बिल्डर, कंत्राटदारांसाठी दबावाचा आरोप

हे ही वाचा >> विखे पाटलांच्या मुख्यमंत्रिपदावरून अब्दुल सत्तारांचं वक्तव्य, म्हणाले, “माझी छाती फाडून…”

अजित पवार म्हणाले, आधी एन्रॉन प्रकल्पालाही असाच विरोध झाला होता. भाजपा शिवसेनेने त्या काळी तो प्रकल्प आणला. त्यानंतर समृद्धी महामार्गालाही विरोध झाला होता. परंतु लोकांना योग्य मोबदला मिळाल्यावर विरोध दूर झाला. त्याप्रमाणे बारसूतील प्रकल्पाकडेही पाहता येईल. परंतु कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा. आधी लोकांच्या मनातले गैरसमज दूर करावे, संवेदनशील मार्ग काढावा, त्यानंतर सरकारने हा प्रकल्प करावा.