अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके सध्या चर्चेत आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक असून त्यासाठी ते शरद पवार गटात जाणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “निलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांनी एका मंत्र्यांविरोधात माझ्याकडे तक्रार केली. त्यांच्यासमोर सतत अडचणी येत आहेत. मी त्यांना आश्वासित केलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि आपण एकत्र बसू. तुम्हाला ज्या मंत्र्यामुळं त्रास होतो, त्यांनाही आपण बोलवुया. जे समज-गैरसमज झाले असतील ते सोडवुया. पण तू व्यवस्थित राहा, चुकीचा निर्णय घेऊ नको, अशी मी त्यांची समजूत घातली होती”, असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांना जर राष्ट्रवादीतून बाहेर पडायचे असेल तर काय होईल, हेदेखील अजित पवार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा