उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (सोमवार, २३ ऑक्टोबर) सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामं आणि लोकांच्या प्रश्नांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देण्यामागचं कारणही सांगितलं. शिवाय आगामी निवडणुकीत जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेशा जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला.

उपस्थित लोकांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, “राज्यातील वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी, आपली कामं होण्यासाठी, बहुजन समाज, वंचित, गरीब, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक वर्गाचं भलं होण्यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे. आज ४५-५० आमदार अशी भूमिका घेतात, हे साधी गोष्ट नाही. आम्हीही ३०-३५ वर्षे समाजकार्य-राजकारण केलं आहे. आम्हीही वरिष्ठांचा मान राखला आहे. वरिष्ठांचा आदर केला आहे. वरिष्ठांनी जे सांगितलं त्याची अंमलबजावणी केली आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.”

BJP MP Ashok Chavan
Ashok Chavan : “राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “काँग्रेस…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
cm devendra fadnavis confident on bjp government to fulfill expectations of people of delhi
केजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Delhi Election Result 2025
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”
अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे 'जायंट किलर' पर्वेश वर्मा कोण आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Who is Parvesh Varma : अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ पर्वेश वर्मा कोण आहेत?
Delhi Exit Poll
Delhi Election : “चौथ्यांदा असं घडतंय…”, एक्झिट पोलमधील अंदाज विरोधात असूनही ‘आप’ला का आहे विजयाची खात्री
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत”; रोहित पवारांचं स्पष्ट विधान, म्हणाले, “त्यांनी माफी…”

अजित पवार पुढे म्हणाले, “२०१४ साली आमच्या वरिष्ठांनी भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला. तेव्हा आम्ही गप्प बसलो. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही मान्य केला. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत. त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यातूनच आम्ही ही भूमिका स्वीकारली. आम्ही त्यांना (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) सांगितलं होतं की, साधारण शिंदे गटाचे जेवढी मंत्रिपदं असतील, तेवढी मंत्रिपदं आम्हालाही मिळावीत. कारण त्यांचेही ५० आमदार आहेत आणि आमचेही तेवढेच आमदार आहेत.”

हेही वाचा- “माझे काका मला चांगल्याप्रकारे ओळखत असावेत, म्हणून…”, अजित पवारांबद्दल रोहित पवारांचं सूचक विधान

“सगळ्यात जास्त आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे १०६ आणि बाहेरून पाठिंबा देणारे ९ असे एकूण ११५ आमदार त्यांच्या विचाराचे आहेत. पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीचे ९ सहकारी मंत्रिमंडळात घेतले. मात्र भाजपाची संख्या अधिक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे त्रिवार सत्य आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. त्यांचेही वरिष्ठ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय होत असतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या काही जागा मिळतील, त्यातून तुम्हाला नाराज करणार नाही, एवढाच शब्द मी तुम्हाला देतो. कारण सहा-सहा वेळा निवडून येणं, ही साधी सोपी गोष्ट नाही. एकदा निवडून आल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून येताना मी-मी म्हणणाऱ्यांची फाटते. पण आम्हाला माहीत आहे, माणसं कशी सांभाळावी लागतात,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Story img Loader