राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षातील अंतर्गत वाद, पाडापाडी व जिरवाजिरवीच्या राजकारणावरून कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. तसेच प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी पक्षाचं काम केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते गुरुवारी (१५ जून)धुळ्यात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “गेल्या काही वर्षात आपल्यातील वादामुळे, जिरवाजिरवीच्या खेळामुळे धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे यापुढे पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं पाहिजे.”

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये

“पैसा जनतेचा आणि जाहिरातबाजी यांची”

दरम्यान, अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. “पैसा जनतेचा आणि जाहिरातबाजी यांची. कोणाला बघायचे नसेल तरी यांचेच फोटो बघा,” असे टीकास्त्र अजित पवार यांनी येथे नंदूरबारमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे – फडणवीस सरकारवर सोडले.

“जाहिरातबाजीतून जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार आहे का?”

अजित पवार म्हणाले, “सरकारच्या जाहिरातबाजीतून जनतेच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटणार आहे का, मग हा करोडो रुपयांचा खर्च कशासाठी? शासन आपल्या दारी मोहिमेत करोडो रुपये खर्च होत आहेत. लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम तुमचेच आहे, त्याच्यासाठी जाहिरातबाजी का?” दीड वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याबद्दलही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा : ‘त्या’ जाहिराती कोणी दिल्या? अजित पवार म्हणाले, “अधिकाऱ्यांनी मला सांगितलं…”

“राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या”

“राज्यात अवकाळी आणि वादळाने मोठे नुकसान झाले असतांना शेतकऱ्यांच्या पदरी घोषणांव्यतिरिक्त काहीही पडलेले नाही. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. राजकीय हस्तक्षेप नसल्यास वारकऱ्यांचा पालखी सोहळा शांततेत पार पडतो. जलजीवन योजनेत गावपाड्याचे निरीक्षण न करताच ठेकेदारांच्या सोईसाठी निविदा काढण्याचे काम सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीची कामे, पानंद रस्ते या सर्वाच्या मंजुरीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे,” असे आरोप अजित पवारांनी केले.

Story img Loader