लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

श्रीवर्धन : देशात नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही हे पुन्हा एकदा चार राज्यातील निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथे भाजपचे सरकार येत आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी अभिनंदन करतो. श्रीवर्धन येथे पाणीपुरवठा योजना आणि समुद्रकिनारा सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्या दरम्यान अजित पवार बोलत होते…

Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर
काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार? (फोटो सौजन्य)
Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
PM Modi Addresses Public Rally At RK Puram In Delhi
दिल्ली प्रचाराची आज सांगता!पंतप्रधानांकडून अर्थसंकल्पाची प्रशंसा; विरोधकांवर टीका
Budget 2025 Bihar National Institute of Food Technology
निवडणूक वर्षात बिहारवर पुन्हा खैरात
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा-‘घरी बसलेल्या नेत्यांना मतदार आता कायमचं…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका

तेलंगणाचे भारतीय तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या चार महत्वाच्या राज्यांचे निवडणूक निकाल आज लागले. तेलंगणाचे बिआरएसचे चंद्रशेखर राव हे महाराष्ट्रात यायचे, सभा घ्यायचे प्रचार करायचे, देशात आणि राज्यात सरकार निर्माण करायला निघाले होते. मला कळायचे नाही निवडणूक तेलंगणाची आहे की महाराष्ट्राची आहे. पण महाराष्ट्रात सत्ता काबीज करण्यासाठी निघालेल्या राव यांची तेलंगणातील सत्ता राखता येणार नसल्याचे दिसतंय. शेवटी जनता जनार्दन सर्व ठरवते. या निकालांनी पुन्हा एकदा एक्झिट पोलचे अंदाज चुकवले आहेत. काही दिवसांपूर्वी चार राज्यात निवडणूका झाल्या आज निकालाचा दिवस होता. तेलंगणाचे बिआरएस राव महाराष्ट्रात यायचे इथे येऊन प्रचार करायचे, पण निकालावरून त्यांची परिस्थिती बिकट आहे. जनता जनार्दन सर्वोच्च आहे. एक्झिट पोल चुकीचे ठरले की काय असे म्हणायची वेळ आली आहे अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली.

छत्तीसगडमध्ये भाजपकडे चेहरा नाही असे म्हटले जात होते. पण नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. असंही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

Story img Loader