प्रहार पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा भाजपाला लक्ष्य केलं आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. तर, मग सगळे पक्ष विलीन करून भाजपात जाणं हा चांगला मार्ग आहे, असा हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे. ते बुलढाण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आणि संधी मिळाल्यास अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, अशी दोन विधान देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या मनात काय आहे, हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढत अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असतील, तर लोकांमध्ये मोठा संभ्रम आहे. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढतो, त्यांना मुख्यमंत्री करतात. इथे उलटे होत आहे.”

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Fight video Woman abuses and beat ola cab driver for missing her flight at mumbai airport viral video
“तिची हिंमत कशी झाली…” आधी शिवीगाळ मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, फ्लाइट चुकली म्हणून महिलेने कॅबचालकाला दिला चोप, संतापजनक VIDEO व्हायरल

हेही वाचा : “महाराष्ट्रात यमाचा रेडा फिरतोय, त्यावर मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री बसलेत”, संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांचं सर्व देवेंद्र फडणवीस हे ठरवणार, हाही मोठा संभ्रम आहे. कुणाच्या नेतृत्वात निवडणूक लढायची, कोण मुख्यमंत्री होणार हेही देवेंद्र फडणवीस ठरवणार. त्यापेक्षा सगळे पक्ष विलीनकरून भाजपात जाणं, हाच चांगला मार्ग आहे,” असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे.

हेही वाचा : “फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार अन् उद्धव ठाकरे…”, भाजपाचा हल्लाबोल

‘बच्चू कडू माझे चांगले मित्र आहेत’, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “बावनकुळे हे माझे सुद्धा मित्र आहेत. पण, ते माझ्याच मतदारसंघात येऊन मला पाडण्यासाठी रचना करा असं सांगतात. त्यामुळे भेट भगतसिंह आणि राजगुरूसारखी झाली पाहिजे. अफजल खानासारखी होऊ नये.”

‘मुख्यमंत्रीपद गेल्यावर फडणवीसांचे डोळे पाणवले होते,’ अस मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं. यावर प्रश्न विचारल्यानंतर बच्चू कडू म्हणाले, “रवींद्र चव्हाणांना दिसलं असेल. पण, अन्य कुणाला पाणावलेले डोळे दिसले नाहीत. चव्हाणांनी कोणता चष्मा लावलाय हे पाहावं लागेल.”

Story img Loader