Ambadas Danave on Vidhansabha Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आगामी निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचे संकेतही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील काही नेत्यांनी दिले. त्यानंतर आता विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट काँग्रेसवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा अतिआत्मविश्वास नडला असं अंबादास दानवे म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले, “लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनात जास्त आत्मविश्वास आला असावा. जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस जिंकू शकत होती, अशी स्थिती होती.”

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Maharashtra Assembly Election , Konkan ,
विधानसभेतील पराभवानंतर कोकणात उद्धव ठाकरे गटाला गळती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…

दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर आणावा अशी भूमिका शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यांनी आधापासूनच घेतली होती. संजय राऊतांनी ही भूमिका वेळोवेळी बोलूनही दाखवली. परंतु, या भूमिकेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने विरोध केला. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर न ठेवता विधानसभा निवडणूक लढवली. मुख्यमंत्री पदाबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठरवलं जाईल, असं महाविकास आघाडीचं ठरलं. मात्र, याच सुत्रामुळे महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्क्याने पराभव स्वीकारावा लागला असं मत अंबादास दानवेंनी व्यक्त केलंय.

ते म्हणाले, “कोणतं खातं मिळावं याकरता काँग्रेस चर्चा करत होते. मुख्यमंत्री पदासाठी १० जण इच्छुक होते हे सत्य आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे आलं असतं तर २-५ टक्के जास्त मते मिळाली असती.”

हेही वाचा >> Sharad Pawar : “शरद पवारांनी कायमचं घरी बसावं, त्यांनी अनेकांचं वाटोळं केलंय”, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याची बोचरी टीका

u

महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार?

विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा त्यांचा आग्रह आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आगामी निवडणुका स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले. यावर आता संजय राऊत यांनी सविस्तर भूमिका व्यक्त केली आहे. पराभव होताच मविआमधून बाहेर पडण्याचा काही जणांनी सूर आळवला असला तरी ही निवडक कार्यकर्त्यांची भावना आहे. पक्षाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Story img Loader