भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाही. ते उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात काय केलं? असं विचारत आहेत, असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. याला आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “मंत्रालयात आल्यानेच काम होत असते, तर फार परिवर्तन झालं असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी करोना काळात कुठे-कुठे गेले होते, हे विचारलं पाहिजे. अडीच वर्षांत काय केलं, हे एका थंबवर कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना आणि धारावीतील जनतेला विचारा. महाराष्ट्राच्या इतिहासातील अभुतपूर्व काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.”

Ajit Pawar, Ajit Pawar rebuked municipal commissioner,
“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
Nitin Gadkari asserts that e vehicle manufacturers should no longer need government subsidies
ई-वाहन निर्मात्यांना सरकारी अनुदान यापुढे नको – गडकरी
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
manipur bjp mla wrote to amit shah
“शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलात, मणिपूरमधून सैन्य मागे घ्या”; भाजपा आमदाराचे अमित शाह यांना पत्र
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

“केंद्रातील मंत्र्यांना कवडीचेही काम नाही. केंद्रीय मंत्र्यांना २६ दिवसांचे दौरे दिले जातात. मंत्री जनतेची काय कामे करतात? पण, उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह नाही. तरीही त्यांच्याविरोधात केंद्र आणि राज्यातील मंत्री दळण दळतात. यातच उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ताकद दिसून आली आहे,” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं.