पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली, असा आरोप मोदींनी ठाकरेंवर केला होता. महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी हे विधान केलं होतं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.

“ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हालू दिली नसती,” असं प्रत्युत्तर दानवे यांनी दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
CM Devendra Fadnavis on Meeting with MNS chief Raj
Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंची भेट घेण्यामागील कारण, म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्यानंतर…”
Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

अंबादास दानवे म्हणाले, “२०१४ साली दोन-तीन जागांसाठी वाद झाला. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन युती तोडली. आताही ‘मातोश्री’वर दिलेल्या शब्दाला छेद कोणी दिला? हे महाराष्ट्राला माहिती आहे.”

हेही वाचा : “अपात्रतेचा निर्णय शिंदेंच्या बाजूने लागेल”, बच्चू कडूंच्या विधानावर ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले…

“ठाकरे घराणे खोटे बोलते, असं सांगण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. कारण, ठाकरे कुटुंबीय शब्दांसाठी बाजी लावणारे आहे. ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती. भाजपाला ठाकरेंचं महत्व माहिती आहे. त्यामुळे ते ठाकरे नाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Story img Loader