पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली, असा आरोप मोदींनी ठाकरेंवर केला होता. महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी हे विधान केलं होतं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.

“ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हालू दिली नसती,” असं प्रत्युत्तर दानवे यांनी दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Bhumi Pujan of Amravati s Textile Park
अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन, नाना पटोले यांचा आरोप
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
aap leader Atishi
विश्लेषण: पहिल्यांदाच आमदार, पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्रीपद; आतिशींच्या निवडीमागे ‘आप’चे कोणते समीकरण?
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
it is not good for person holding post of Prime Minister visiting house of Chief Justice of country on occasion of Ganapati Puja
गोंदियाः ‘हे’पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही,कॉग्रेसचे चेनीथल्ला म्हणतात,‘मुख्य न्यायाधीशांच्या घरी…’

अंबादास दानवे म्हणाले, “२०१४ साली दोन-तीन जागांसाठी वाद झाला. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन युती तोडली. आताही ‘मातोश्री’वर दिलेल्या शब्दाला छेद कोणी दिला? हे महाराष्ट्राला माहिती आहे.”

हेही वाचा : “अपात्रतेचा निर्णय शिंदेंच्या बाजूने लागेल”, बच्चू कडूंच्या विधानावर ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले…

“ठाकरे घराणे खोटे बोलते, असं सांगण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. कारण, ठाकरे कुटुंबीय शब्दांसाठी बाजी लावणारे आहे. ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती. भाजपाला ठाकरेंचं महत्व माहिती आहे. त्यामुळे ते ठाकरे नाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.