विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यासाठी सुरुवातीला ठाकरे गटातील आमदारांची बाजू ऐकून घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलं आहे. अशात बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेची निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबाबत मजबुतीने आणि चलाखीने कामगिरी बजावली. त्यामुळे अपात्रतेचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं.

bjp candidate selection process through lottery in maharashtra
विश्लेषण : चिठ्ठीतील ‘नशीबवानां’कडे लक्ष; भाजपची उमेदवार निवडीची पद्धत राज्यात किती फायदेशीर? ती वादग्रस्त का ठरतेय?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!
Devendra Fadnavis on nitin gadkari
“अनुदानाची शाश्वती नाही, लाडकी बहीणसाठी पैसे द्यावे लागतात”, नितीन गडकरींच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
Mohan Bhagwat JP Nadda
“भाजपाला पूर्वी RSS ची गरज होती, आता…”, नड्डांच्या वक्तव्यावर संघाची प्रतिक्रिया; म्हणाले, “कौटुंबिक वाद…”
Jayant Patil
Jayant Patil : “एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली”, जयंत पाटलांचं येवल्यात विधान; इच्छा व्यक्त करणारा नेता कोण? चर्चांना उधाण
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया

हेही वाचा : “भाजपाने नाहीतर शिवसेनेनं युती तोडली”, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “एकीकडे…”

यावर ‘टीव्ही ९ मराठी’ला अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. काहीतरी कुरापती काढून विलंब लावला जात आहे. बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून कळतं की, निर्णय काय द्यायचा हे आधीच ठरलं होतं की काय? पण, आमच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय आहे. म्हणून अध्यक्षांनी दिलेला निकाल अखेरचा असेल, अशी शक्यता नाही,” असं दानवेंनी म्हटलं.

हेही वाचा : “लोकसभेत नारायण राणे वैचारिक उंचीप्रमाणे बोलले, त्यामुळे…”, अरविंद सावंत यांची टीका

दररोज एक असे ५३ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत, यावर विचारल्यावर अंबादास दानवे म्हणाले, “हा वेळकाढूपणा असल्याचं मी बोललो आहे. सगळ्या आमदारांची बाजू एकत्रच ऐकली पाहिजे. ४० गद्दार आणि आमचे आमदार काय वेगळी भूमिका मांडणार आहेत?”