Amit Deshmukh On Congress State President Nana Patole : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसलाही विधानसभेच्या निवडणुकीत मोठं अपयश आलं. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर खरंच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे का? या प्रश्नावर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच अशी कोणतीही चर्चा नसल्याचं सांगत महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार नसल्याचंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

अमित देशमुख काय म्हणाले?

विधानसभेत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल? यावर बोलताना अमित देशमुख म्हणाले की,”असं आहे की एकदा पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून पुन्हा कामाला लागावं लागतं. आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कामाला लागला आहे. आमची वैचारीक लढाई सुरु आहे आणि सुरु राहणार आहे. काँग्रेसचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत”, अमित देशमुखांनी म्हटलं.

Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
Delhi Election Result 2025
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’च्या नेत्यानेच केजरीवालांना दिला सल्ला; म्हणाले, “काँग्रेसबरोबर…”
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
Kerala Politics
Kerala Politics : आगामी विधानसभेनंतर केरळच्या मुख्यमंत्री पदावर आययूएमएल दावा करणार? मित्रपक्ष काँग्रेसला दिला इशारा
Karnataka BJP leadership feud intensifies with anti-Yediyurappa camp proposing a new name for state unit chief.
“…तर कर्नाटकात दहा जागाही मिळणार नाहीत”, कर्नाटक भाजपामध्ये पेटला अंतर्गत वाद; प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

हेही वाचा : “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का?

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधकांकडे संख्याबळ कमी असल्यामुळे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. यासंदर्भात बोलताना अमित देशमुख यांनी म्हटलं की, “आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधीपक्ष नेत्याबाबतची मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद त्यांनी दिलं पाहिजे. त्याचा विचार ते करत असतील”, असंही त्यांनी म्हटलं.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा

विधानसभेतील अपयशानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा आहे? पक्षात देखील खरंच प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे का? असा प्रश्न विचारला असता अमित देशमुख म्हणाले, “अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असतानाच काँग्रेसला मोठं यश मिळालं. त्यामुळे ते यश विसरून चालणार नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीत म्हणावा तसा कौल आला नाही म्हणून टीका करणं हे अन्यायकारक आहे. मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात अशी कोणतीही चर्चा नाही”, असं अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

विरोधकांना ईव्हीएमबाबत संशय का?

“सध्या ईव्हीएमबाबत अनेकांना संशय आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा संशय दूर केला पाहिजे. हा संशय माझा नाही तर मतदारांचाही आहे. त्यामुळे कोणी लोकशाही प्रणालीवर शंका उपस्थित करत असेल तर ती शंका दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. तुम्ही काही ठिकाणी ईव्हीएमवर निवडणूक घेतली तर काही ठिकाणी बॅलेटवर घ्या, म्हणजे शंका होतील”, असंही अमित देशमुख यांनी म्हटलं.

Story img Loader