आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी देशभर मोर्चेबांधणी करत आहे. एका बाजूला इंडिया आघाडीतले पक्ष आपसात जागावाटप करण्यासंदर्भात चर्चा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये विरोधी पक्षांमधून नेत्यांचं इनकमिंग चालू आहे. भाजपाप्रणित एनडीए प्रत्येक लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यावर लक्ष देत आहे. गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी भाजपात आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात एनडीएची ताकद वाढू लागली आहे. दोन महिन्यांपूर्वी बिहारमधील भाजपाचे जुने सहकारी नितीश कुमारही एनडीएत परतले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा