शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. दिल्लीत त्यांना महादजी शिंदेंच्या नावाने असलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. साहित्य संमेलनात घडलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी दिल्ली एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शाह यांचा सत्कार केला अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या टीकेला आता खासदार अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.”

Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीने त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं, दिल्लीत नेमकं काय घडलं?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
Asha Bhosle Said This Thing About Eknath Shinde
Asha Bhosle : आशा भोसलेंनी केलं एकनाथ शिंदेंचं कौतुक, “बाळासाहेब ठाकरेंनी एकट्याने शिवसेना घडवली तशी…”
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?

ज्यांनी शिवसेना फोडली अशांचा सन्मान केल्याने आम्हाला वेदना-राऊत

“ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, असंही संजय राऊत म्हणाले. आता संजय राऊत यांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांना इतका त्रास होत असेल तर…

संजय राऊत यांची एक भूमिका नक्कीच असू शकते. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे. शरद पवारांनी स्टेटमनशिपचं उदाहरण घालून दिलं आहे. महाराष्ट्र त्यासाठी ओळखला जातो. संजय राऊत यांचं वैयक्तिक मत काहीही असू शकतं पण या सत्कारात काही गैर आहे असं मला वाटत नाही. शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी ते ठामपणे उभे आहेत. इथे राजकीय भूमिका न घेता स्टेटमनशिपचा आदर्श घालून दिला. संजय राऊत यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर मला माहीत नाही. साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे उत्साह कायम आहे. जे राज्याबाहेरचे मराठी लोक आहेत त्यांनाही या संमेलनामुळे आनंद झाला आहे. दिल्लीत साहित्य संमेलन होण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी प्रयत्न केले आहेत. राजकारण आम्हाला कळतं असं राऊत म्हणाले पण ते उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारकं आहे. शरद पवारांच्या राजकारणावर बोलण्याची उंची फार कमी लोकांची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. राऊत यांना इतकं दुःख असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरेही अजित पवारांना भेटले होते. आपण याला स्टेटमनशिप म्हणून बघू, प्रत्येकवेळी राजकाण आणलं तर अवघड होईल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला तेव्हा हे विधान केलं आहे.

Story img Loader