Amol Mitkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) कोसळला. आठ महिन्यांपूर्वी या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या घटनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, याबाबत सत्ताधारी पक्षातील एका आमदारानेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर संताप व्यक्त केला आहे. मिटकरी म्हणाले, “आपटे नावाच्या एका नवशिक्या शिल्पकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प तयार केलं होतं. त्याने तयार केलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. या पुतळ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ एक खोच दाखवण्यात आली आहे. या संदर्भात त्याने सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा अजेंडा होता का असा प्रश्न पडला आहे”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “आपटे याने त्याच्या मुलाखतीत म्हटलं होतं की त्याला १६५९ नंतरचे छत्रपती शिवाजी महाराज रेखाटायचे होते. १६५९ मध्ये अफजलखानाबरोबर झालेल्या रणसंग्रामावेळी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता. मात्र, ऐतिहासिक संदर्भ थोडे वेगळे आहेत. जेधे शकावली, कवी परमानंद यांनी लिहिलेलं शिवभारत, तत्कालीन शाहीर अज्ञानदास यांनी लिहिलेले पोवाडे, तसेच इतिहासाची इतर साधने सांगतात की महाराज अफजलखानाशी दोन हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. याबाबतचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. मात्र अशा प्रकारचा पुतळा बनवून आपटे याला काय सांगायचं होतं? हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची किती प्रतारणा करणार आहेत? यांची मळमळ अजून का गेली नाही?”

अमोल मिटकरी यांची एक्सवरील पोस्ट (PC : Amol Mitkari/X)

हे ही वाचा >> Sangeeta Thombre : भाजपा नेत्या संगीता ठोंबरेंच्या कारवर दगडफेक, चालकासह माजी आमदार जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा देशातला असा एकमेव पुतळा होता ज्यामध्ये अशी खून दाखवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचं कंत्राट घेतलं, त्या माध्यमातून छुपा अजेंडा चालवण्याचं पाप आपटे याने केलं आहे. माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी आपटेवर कारवाई करावी. मिसरूड न फुटलेल्या, अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावर म्हणजेच जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं”.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “आपटे याने त्याच्या मुलाखतीत म्हटलं होतं की त्याला १६५९ नंतरचे छत्रपती शिवाजी महाराज रेखाटायचे होते. १६५९ मध्ये अफजलखानाबरोबर झालेल्या रणसंग्रामावेळी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता. मात्र, ऐतिहासिक संदर्भ थोडे वेगळे आहेत. जेधे शकावली, कवी परमानंद यांनी लिहिलेलं शिवभारत, तत्कालीन शाहीर अज्ञानदास यांनी लिहिलेले पोवाडे, तसेच इतिहासाची इतर साधने सांगतात की महाराज अफजलखानाशी दोन हात करण्यासाठी गेले तेव्हा खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. याबाबतचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. मात्र अशा प्रकारचा पुतळा बनवून आपटे याला काय सांगायचं होतं? हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची किती प्रतारणा करणार आहेत? यांची मळमळ अजून का गेली नाही?”

अमोल मिटकरी यांची एक्सवरील पोस्ट (PC : Amol Mitkari/X)

हे ही वाचा >> Sangeeta Thombre : भाजपा नेत्या संगीता ठोंबरेंच्या कारवर दगडफेक, चालकासह माजी आमदार जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

देवेंद्र फडणवीसांकडे केली कारवाईची मागणी

मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा देशातला असा एकमेव पुतळा होता ज्यामध्ये अशी खून दाखवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचं कंत्राट घेतलं, त्या माध्यमातून छुपा अजेंडा चालवण्याचं पाप आपटे याने केलं आहे. माझी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी आपटेवर कारवाई करावी. मिसरूड न फुटलेल्या, अनुभव नसलेल्या अक्कलशून्य माणसावर म्हणजेच जयदीप आपटे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलबंद करावं”.