अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या क्रार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रक्ततुला करण्यात येणार आहे. या रक्ततुलेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. “शिंदे गट आणि भाजपामधील नेत्यांची निष्ठी संपली आहे. मंत्रीपदासाठी भाजपा आमदार आणि शिंदे गट देवेंद्र फडणवीसांना खूष करत आहेत, अशी टीका मिटकरांनी केली आहे.

हेही वाचा- “खरा धृतराष्ट्र कोण हे महाराष्ट्राने पाहिलं, शेवटी महाभारत..,” शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनंतर आता भाजपाच्या चित्रा वाघ आक्रमक

रवी राणांना मंत्रीपद मिळावे म्हणून नवनीत राणांचे प्रयत्न

“मंत्रीपद मिळवण्यासाठी रवी राणांना आणखी काय काय करावे लागेल हे येणारा काळच ठरवेल. रक्ततुलाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठी आणि रवी राणा यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून नवनीत राणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे”, अशी टीका मिटकरींनी केली आहे. भाजपासोबत शिंदे गटाचेही सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना खूष करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा- “देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

मंत्रीपदाच्या लालसेपोटी अट्टाहास

देवेंद्र फडणवीस हे कृष्णरुपी असल्याचे वक्तव्यही आशिष शेलारांनी केलं होतं. फडणवीसांना खूष केलं तर ते आपल्याला मंत्रीपद देऊ शकतात या लालसेपोटीच राणा दाम्पत्याचा हा अट्टाहास सुरु असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे.