बडनेरा ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावजवळ रेल्वे रुळ तुटल्याने प्रवासी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एक मालगाडी या मार्गावरून गेल्यानंतर रेल्वे रूळ तुटून वेगळा झाला होता. त्यानंतर एका तरुणाच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. त्याने लगेच रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली आणि रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. यानंतर काही वेळाने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले व रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.

दरम्यान, दुरूस्ती काम होण्या अगोदर बडनेरा-नरखेड मेमू, काचीगुडा-नरखेड एक्स्प्रेस या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

fog on railway track
कल्याण: दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल अर्धा तास उशिरा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Koper news
डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
Criticism of the bmc on social media due to the high level of asphalt on the sea coast road causing problems to motorists Mumbai news
सागरी किनारा मार्गावर डांबराच्या उंचवट्यामुळे वाहनचालकांना त्रास; समाजमाध्यमांवरून पालिकेवर टीका
Railway ticket inspector, passenger saved,
मुंबई : तिकीट तपासनीसाच्या सतर्कतेमुळे प्रवाशाला जीवदान
local train services on western and harbour line disrupted due to power outage
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वे, हार्बर मार्ग विस्कळीत
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….

अमरावतीपासून १० किलोमीटर अंतरावरील वलगाव येथील रेल्वे फाटकाजवळ ही घटना शनिवारी दुपारी घडली. या मार्गावरून चार प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. सोबतच मालगाड्यांचीही वाहतूक सुरू असते. शनिवारी दुपारी एक मालगाडी या मार्गावरून गेल्यानंतर रेल्वे रुळ तुटून वेगळा झाला होता. त्यानंतर अमरावती येथील रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून दुरूस्तीचे कार्य सुरू केले होते. दरम्यान, दुरुस्तीचे काम होईपर्यंत या मार्गावरील दोन रेल्वेगाड्या खोळंबल्याची माहिती समोर आली होती.