‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी काल महिला पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आल्या असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला.

हेही वाचा – “आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो”, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले “भारतमाता विधवा…”

kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
mukhyamantri vayoshri yojana
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी पात्रता काय? अर्ज करण्यासाठी कोणती…
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“माझ्या मनात भिडे गुरुजींबद्दल आदर आहे. ते हिंदुत्त्वाचे स्तंभ आहेत. पण मला असं वाटतं, महिलांनी कसं जगावं हे कोणी सांगू नये, तिची एक जीवनशैली असते, त्याप्रकारे ती जीवन जगत असते”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

नेमकं घडलं होतं?

संभाजी भिडेंनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एका महिला पत्रकाराने त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देण्याऐवजी त्यांनी “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही”, असे वादग्रस्त विधान केले होते.

हेही वाचा – रवी राणा-बच्चू कडू यांच्यात पुन्हा वाद? नवनीत राणा म्हणाल्या, “खासदार म्हणून एवढंच सांगेन…”

महिला आयोगाकडून भिंडेंना नोटीस

संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली. महिला आयोगाच्यावतीने नोटीस बजावत याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, याबाबत बोलताना राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर म्हणाल्या, “एक महिला पत्रकार शिक्षण घेऊन तिथेपर्यंत पोहचली आहे. टिकलीवरून महिलेची पात्रता आणि पद ठरवणे चुकीचं आहे. ही समाजाची विकृती आहे. सातत्याने महिलांना दुय्यम लेखणाऱ्यांची विकृती नाहीशी करायची आहे.”