करोना काळात मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाने नेते किरीट सोमय्या यांनी केली होता. तसेच त्यांनी याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती. याप्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे सरकारवर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – ईडीने चार तास चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

काय म्हणाले अनिल परब?

मुंबई महापालिकेच्या प्रभाग परिसीमन प्रकरणी दाखल याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या चौकशीबाबत विचारण्यात आले असता, “इकबालसिंह चहल यांची चौकशी होते आहे, याचा अर्थ महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत”, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिंदे सरकारला लगावला.

दरम्यान, प्रभाग परिसीमन प्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीबाबत बोलताना, “महाविकास आघाडी सरकार असताना मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डाचे २३६ वॉर्ड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयानेही या निर्णयाला मंजूरी देत त्वरीत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, करोना, पाऊस आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, नवीन सरकारने कायदा बदलून पुन्हा २३६ चे २२७ वॉर्ड केले. त्याला पुन्हा आमच्यावतीने आव्हान देण्यात आले होते आणि न्यायालयाने याला स्थगिती दिली. याबाबत आज सुनावणी झाली. यावेळी योग्य कारण न देता कायदा बदलता येत नाही, अशी बाजू आमच्या वकीलांकडून मांडण्यात आली. याबाबत दोन दिवसांत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे”, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा – “अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होईल”, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं विधान

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाच्या मुदतीबाबतही प्रतिक्रिया दिली. याबाबत आम्ही उद्या निवडणूक आयोगाकडे बाजू मांडणार असल्याचं, ते म्हणाले. तसेच चिन्ह आणि नावाबाबात बोलताना, याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे आवश्यक ती कागतपत्रे सादर केली असून याबाबतही लवकर निर्णय येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Story img Loader