मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. यावर समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीवर लटकवलं पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. पण, अण्णा हजारेंनी भाजपाच्या सरकारमध्ये सामील झालेल्या भ्रष्टाचारी लोकांवर आवाज उठवला पाहिजे, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
devendra fadnavis vidhan sabha election bjp
BJP Victory in Vidhan Sabha: महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपासाठी काय बदललं? स्पष्ट बहुमत, युतीवर वर्चस्व की आणखी काही?

संजय राऊत म्हणाले, “गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी करत होतो. मात्र, अण्णांनी थेट मणिपूरच्या विषयाला हात घातला. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. पण, अण्णांची ओळख भ्रष्टाचार विरोधी म्हणून आहे. महाराष्ट्रात भाजपाने पुराव्यासह ज्यांच्यावर आरोप केले, ते सगळे सरकारमध्ये सामील झाले आहेत. यावर अण्णा हजारेंनी आवाज उठवला पाहिजे. अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा शिवसेनेतून बेईमान होऊन गेलेल्या मंत्र्यांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याविषयावर अण्णा हजारेंनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”

हेही वाचा : “…तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती”, महादेव जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

“ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांचा पंतप्रधान मोदी दिल्लीत सत्कार करत आहेत. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे घोटाळे अण्णांच्या डोळ्यासमोर घडत आहेत. रामलीला मैदानावर आंदोलन करून अण्णांनी देशाल जाग केलं होतं. आज अण्णांच्या आंदोलनाची खरी गरज आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे भाजपा सत्तेत आला, तर काँग्रेस पायउतार झाली. आज भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Story img Loader