वाई: शरद पवार यांना उद्देशून सैतान हा शब्द अनवधानाने वापरला असे सांगणाऱ्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर अपघातात काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले असा शब्दप्रयोग केला होता. म्हणून त्यांना गोळ्या घालणार का असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

गावगाड्यांमध्ये सैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावगाड्यातील भाषा प्रस्थापितांना कडवट लागली. मला सेनापती पुन्हा गावगाड्याकडे आश्रयासाठी येत आहे त्याला रोखूया असं म्हणायचं होतं.मात्र असं बोलताना अनवधनान तो शब्द वापरला गेला असे स्पष्टीकरण रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बाोलताना दिले. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर ‘सैतान’ हा शब्द प्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीकेची झाोड उठली. यावर सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात पत्रकारांपुढे आपली भूमिका मांडली.

Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
Ashish Shelar on Raj Thackeray
Ashish Shelar: “मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो की…”, राज ठाकरेंनी निकालावर संशय घेताच भाजपाचा पलटवार
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

आणखी वाचा-“…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील”; भाजपा खासदाराचं थेट विधान, म्हणाले…

शरद पवार यांनी सरदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रावर राज्य केले. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळायला लागले आणि पवार साहेबांवर काळानं मोठा सुड उगवला आहे.त्यामुळे शरद पवार गावगाड्याकडे पुन्हा आश्रयासाठी धावतं आहेत. जैसी करणी वैसी भरणी कलयुगामध्ये ज्याचं पाप त्यालाचं फेडाव लागते. शरद पवारांना त्यांचं पाप खऱ्या अर्थांन फेडावे लागत आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांचं काम आहे की गावगाड्यामध्ये हा सैतान पुन्हा येता कामा नये, अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यावर हा शब्द अनवधनाने वापरला गेला असे ते स्पष्टीकरण देत होते. त्याचवेळी शरद पवार यांनी समृद्धी महामार्गावर अपघात झाला, त्यावेळेस काही लोक ‘देवेंद्रवासी’ झाले असा शब्दप्रयोग केला होता. पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा, त्यांना यावेळी देवाज्ञा झाली असा शब्दप्रयोग वापरायचा असेल परंतु ते देवेंद्रवासी झाले असे म्हणाले. त्यावेळी शरद पवार यांनी तो अनावधानाने तसा उल्लेख केला होता. म्हणून आता त्यांना गोळ्या घालणार का असे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले .गुण्यागोविंदाने शिवसेना-भाजप सरकार नांदत असताना यामध्ये फोडाफोडी कोणी केली, याचा इतिहास तपासावा लागेल. देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाला सध्याच्या घडामोडींचं मोठं श्रेय द्यावं लागेल असा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला.

Story img Loader