अलिबाग – आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. आता या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शनिवारी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. ज्यात राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला, साधकांसाठी मंडप टाकला नाही. त्यामुळे यापुढे भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहनही करण्यात आले होते.

Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
fake ordinance pune news in marathi
पुणे : बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न उघड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल
Accused sentenced to 10 years in hard labor for abusing minor girl in Dharashiv
अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; आरोपीस १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Kerala Double Murder
जादूटोण्याच्या संशयातून पाच वर्षांत संपूर्ण कुटुंब संपवलं; जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचं कृत्य
Saif Ali Khan Records Statement With Mumbai Police
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हेही वाचा – नाइलाजाने काम करावे लागणे हा त्यांचा प्रश्न – पृथ्वीराज चव्हाण

समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारीत होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही नोंदवली आहे. यानंतर शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादवी कलम ५००, ५०१, ५०५ (२), ५०५ (३) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६ सी आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – “इतके राजकीय भूकंप झाले तर… मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे” पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत

खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक सद्भावना पत्र जारी केले होते. परंतु या पत्राच्या मजकुरात बदल करून, अनुयायांमध्ये राज्यशासनाच्या विरोधात शत्रुत्वाची, तसेच द्वेशभावना तयार होईल, सरकारविरोधात उठाव होईल या उद्देशाने खोटे पत्रक तयार करून ते समाजमाध्यमांवर टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान समाजमाध्यमांवर या बनावट पत्रकाचा प्रसार करू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Story img Loader