राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २०१९ साली विधानसभेच्या प्रचारातील पावसातील भाषण तुफान गाजले. त्यांच्या भाषणाची आजही राजकीय वर्तुळात चर्चा असते. काल (२६ नोव्हेंबर) असाच अवकाळी पाऊस झाला, नेमकं तेव्हाच शरद पवारांचं नवी मुंबईत भाषण सुरू होतं. नवी मुंबईत भर पावसात झालेल्या भाषणाचीही आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

“मला असं वाटतं स्वतःचा पक्ष वाचवण्याची ही त्यांची धडपड आहे. कोणी कुठे सभा घ्यावी हा लोकशाहीत ज्याचा त्याचा अधिकार आहे”, असं आशिष शेलार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पावसात सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते. आता सभा घेतल्यानंतर उरलेल्या दीड वर्षांत राष्ट्रवादी लोणच्याएवढी तरी राहील का. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
msrtc employees strike continues as no solution found on demands
ST Employee Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; सरकारकडून पगारात साडे सहा हजारांची वाढ
26 bjp activists from chhattisgarh allotted one constituency to win marathwada
मराठवाड्यात भाजपकडून छत्तीसगडमधील कायर्कर्त्यांची कुमक
bjp leader harshvardhan patil marathi news
हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय
cbi investigation into financial irregularities in r g kar medical college
आर्थिक अनियमिततेप्रकरणी ‘सीबीआय’चा तपास; कोलकाता हत्या प्रकरणात आरोपींच्या मालमत्तांचीही झडती
sanjay raut on bjp marathi news
“देशाची आणि राज्याची सूत्रे नागपूरमधून चालतात, मात्र…”, खासदार संजय राऊत यांचा टोला

काल नेमकं काय घडलं?

नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद पवार उपस्थित होते. पाऊस आणि जोराचा वारा वाहत असल्याने येथेही साताऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांनी या लोकांना नाराज केलं नाही. पवारांनी भर पावसात भाषण केलं. साताऱ्यातल्या सभेत दिसलेला शरद पवारांचा तोच जोश, तोच उत्साह आणि तीच आक्रमकता पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

हेही वाचा >> पुन्हा तोच जोश; साताऱ्यानंतर नवी मुंबईत शरद पवारांची भर पावसात सभा, म्हणाले, “निराशेवर मात करून…”

सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर काय?

शरद पवार हे मार्केटमधलं क्रमांक एकचं नाणं आहेत. जेव्हा हेडलाईन करायची असते तेव्हा शरद पवारांचंच नाव घेतलं जातं हे शरद पवार यांचं भाग्य आहे आणि सगळ्यांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. सहा दशकं हे नाणं टिकून आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.