देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१० जुलै) अमरावती येथे पार पडलेल्या सभेत केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी वापरलेल्या कलंक या शब्दावरून राज्यात आता घमासान सुरू झालं असून भाजपातील अनेक नेते आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही टीका केली आहे.

हेही वाचा >> “मी जे म्हटलं ते योग्यच! हे कलंकितच लोक, कारण…”; उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपावर जोरदार टीका

Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Akola Amravati and Malegaon are main centers that issue certificates to Bangladeshis alleges Kirit Somaiya
“बांगलादेशींना प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव मुख्य केंद्र,” किरीट सोमय्या यांचा आरोप
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

“उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील? कलंक तर ते असतात जे नाल्यातील गाळ खातात, कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात, गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात, जे रस्त्यावरचे डांबर खातात, जे “मी आणि माझं कुटुंब” एवढंच जगतात, थोडक्यात काय तर.. जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!”, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा >> VIDEO : उद्धव ठाकरेंनी सभागृहात थेट देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली; म्हणाले, “नागपूरला लागलेले…”

तर तुम्ही जबाबदार असाल

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, “तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मनोरुग्णालयात जा, नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलंय, पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अवडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.”

Story img Loader