देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१० जुलै) अमरावती येथे पार पडलेल्या सभेत केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी वापरलेल्या कलंक या शब्दावरून राज्यात आता घमासान सुरू झालं असून भाजपातील अनेक नेते आता उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही टीका केली आहे.

हेही वाचा >> “मी जे म्हटलं ते योग्यच! हे कलंकितच लोक, कारण…”; उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपावर जोरदार टीका

Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
sanjay raut criticized devendra fadnavis
Sanjay Raut : “हा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार”; राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपाच्या गुंडांनी काल…”
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

“उध्दवजी, जे दुसऱ्यांसाठी जगतात ते कलंक कसे ठरतील? कलंक तर ते असतात जे नाल्यातील गाळ खातात, कोविडमध्ये सुध्दा भ्रष्टाचार करतात, गरिबांच्या पोरांच्या दप्तर, पाटी पेन्सिल मध्ये पण कट कमिशन खातात, जे रस्त्यावरचे डांबर खातात, जे “मी आणि माझं कुटुंब” एवढंच जगतात, थोडक्यात काय तर.. जे मुंबईकरांना लुटतात तेच कलंक ठरतात!”, असं ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

हेही वाचा >> VIDEO : उद्धव ठाकरेंनी सभागृहात थेट देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ ऑडिओ क्लिपच ऐकवली; म्हणाले, “नागपूरला लागलेले…”

तर तुम्ही जबाबदार असाल

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते म्हणाले, “तुमचं संतुलन बिघडलं असेल तर मनोरुग्णालयात जा, नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलंय, पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अवडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.”