नगर: पीक विम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज नाशिकमधील दौऱ्यात राष्ट्रवादीकडून स्वागतासाठी लावलेल्या शुभेच्छाफलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लागला आहे. या संदर्भात मुंडे म्हणाले, की ज्या शरद पवारांना आम्ही दैवत मानतो, त्या देवाने आम्हाला भक्तांना फोटो वापरण्यास मनाई केली आहे. कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. मग आम्ही काय करायचे? तेव्हा आमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ देवावर येऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरू मानत होते, त्या यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आम्ही लावले. 

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Thackeray group on streets against bus fare hike protests at various places in nashik
बस भाडेवाढीविरोधात ठाकरे गट रस्त्यावर, जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
Supriya Sule in audience in Ajit Pawar event
नाराजीनाट्याचा पुढचा अंक इंदापुरात! नक्की काय घडले ? अजित पवार व्यासपीठावर तर खासदार सुप्रिया सुळे प्रेक्षकांत

कांदा व टोमॅटोच्या भावावरून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले. या संदर्भातील प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, की जेव्हा शेतकऱ्यांना ऐतिहासिक २७१० रुपये भाव दिला गेला, त्या वेळेस माध्यमांना ती बातमी करावीशी वाटली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मी अशा तिघांनी बैठक घेतली. आणखी दोन लाख टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला. या कांद्याला २१५० रुपये भाव देऊन तो विकत घेणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र, विरोधाला विरोध करायचे व माध्यमे उपद्रव मूल्याला जास्त महत्त्व देऊ लागल्याने उपद्रवमूल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अशा गोष्टी घडत आहेत, असाही दावा मुंडे यांनी केला.

Story img Loader