प्रहारचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री होणार होते, तेव्हा अंबादास दानवे यांचा जन्मही झाला नव्हता. आम्ही दोन अपक्ष आमदारांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंना मंत्री केलं. तरी, देवेंद्र फडणवीसांच्या बच्चू कडू शिंदे गटात गेले. बच्चू कडूंचा मालक कोण?’ असं विधान अंबादास दानवेंनी केल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर बच्चू कडू म्हणाले, “दानवेंना सांगा, महाविकास आघाडीशीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार होते. तेव्हा अंबादास दानवे यांचा जन्मही झाला नव्हता. या राजकीय घडामोडीशी दानवेंचा कोणताही संबंध नव्हता.”

AnJali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania : “दमानिया नव्हे बदनामिया”, धनंजय मुंडेंच्या टीकेवर अंजली दमानियांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “खरंतर मला…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Uddhav Thackeray Speech News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…”
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…

हेही वाचा : “सिनेट निवडणूक घेण्यास मिंधे-भाजपा सरकार घाबरतंय”, आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटातील नेते प्रत्युत्तर देत म्हणाले…

“उद्धव ठाकरेंना सुरुवातीलाच आम्ही दोन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी दानवेंचा जन्मही झालेला नव्हता. ते चौथी नापास आहेत,” असं टीकास्र बच्चू कडू यांनी सोडलं आहे.

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक आहेत. शिंदेंनी भाजपात उडी घेतली नसती, तर केंद्रीय यंत्रणांनी त्यांना अटक केली असती,’ असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. याबद्दल विचारल्यावर बच्चू कडू यांनी म्हटलं, “आरोप करताना पुराव्यासह करायला पाहिजेत. कुठल्या कारणासाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये गेले असते? हे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट करावं.”

Story img Loader